…तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे निम्मे नेते पक्षात राहिले नसते – मुख्यमंत्री  

0
596

पंढरपूर, दि. ११ (पीसीबी) – भाजप सरकारने दबावाचे, सुडाचे राजकारण केले  असते, तर आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील निम्मे नेते त्यांच्या पक्षात दिसले नसते.   आम्ही कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही, असा निशाणा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साधला. 

पंढरपूर तालुक्यातील काँग्रेस नेते कल्याण काळे यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या चार वर्षे  केंद्रात आणि राज्यात  भाजपच्या काळात  एफआरपीसाठी आमच्या काळात शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली नाहीत. कारखानदारांना ८ सवलती दिल्या. कमी व्याज दराचे कर्ज  दिले, इथेनॉल बाबत महत्वाचा निर्णय घेतला.

मात्र, स्वत:ला ‘जाणता राजा’ म्हणून घेणाऱ्यांनी मंत्री असताना जे निर्णय घेतले नाहीत, ते आम्ही साडे चार वर्षात घेतले. पवारांची टीम आता संपली आहे. आता आमची टीम आहे, असा टोलाही  त्यांनी  लगावला.