ज्यांचे उमेदवार उभे नाहीत, त्यांच्या  सभांना महत्व नसते; आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

0
462

मुंबई, दि. २५ (पीसीबी) –  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपविरोधात सभांचा धडाका लावला आहे. यावर युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपले काका राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.  ज्यांचे लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे नाहीत, अशा सभांना महत्व नसते,  असे आदित्य ठाकरे यांनी  म्हटले आहे.

आज (गुरुवार) आदित्य ठाकरे यांनी ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी   रॅली काढत रोड शो केला. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना जोरदार टोला लगावला. तसेच काँग्रस – राष्ट्रवादीवर  टीकेची झोड उठवली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात भगवे माहोल तयार झाले  आहे. जिथे धनुष्यबाण तिथे धनुष्यबाण, जिथे कमळ तिथे कमळ, लोक ही दोन बटने सोडून दुसरी कोणतीही बटणे दाबत नाहीत. तसेच जनतेला सत्ताधारी पक्षच पुन्हा सत्तेवर  हवा आहे,  असेही त्यांनी सांगितले.  नुसती ईशान्य मुंबई नव्हे तर संपूर्ण मुंबईत सेना-भाजपचे उमेदवार निवडूण येतील, असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला .