जेव्हा देशावर राजपुत्राने राज्य केले, तेव्हा त्यांनी देशाला लुटले – विवेक ओबेरॉय

0
671

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – हिंदूस्तानचा इतिहास पाहा, जेव्हा जेव्हा या देशावर  एखाद्या राजपुत्राने किंवा विदेशी लोकांनी राज्य केले आहे, तेव्हा या लोकांनी केवळ या देशाला लुटले आहे. देशातील सर्व नागरिक हे देशाचे चौकीदार आहेत. हे चौकीदार यापुढे कोणालाही या देशाला लुटू देणार नाहीत, अशा शब्दांत अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

विवेक ओबेरॉय  दिल्लीमध्ये भाजपच्या प्रचार रॅलीत सहभागी झाला होता. यावेळी विवेक ओबेरॉय यांने   राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली . पंतप्रधान मोदींचा विजय निश्चित आहे. अब भारत लुटेगा नही, उठेगा, असे विवेक यावेळी म्हणाला.

दरम्यान, विवेक ओबेरॉय सध्या त्याचा आगामी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. तो सध्या या चित्रपटाचे प्रमोशनदेखील करत आहे.   भाजपच्या दिल्लीत इंडिया गेट येथे आयोजित ‘सातों सीटें मोदी को’ या कॅम्पेनमध्ये विवेक  सहभागी झाला होता.