चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांमधला मार्गदर्शक दुवा निखळला, त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राची हानी – उद्धव ठाकरे

0
560

मुंबई,दि.३०(पीसीबी) – चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांमधला मार्गदर्शक दुवा निखळला, त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राची हानी झाली आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांना आदरांजली वाहिली आहे.

बॉलिवूडला गेल्या 24 तासांत सलग मोठा दुसरा धक्का बसला आहे. इरफान खान यांना जाऊन काही तास होत नाहीयेत तोपर्यंत अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. मुंबईतल्या एका खाजगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्धव ठाकरे यांनी ऋषी कपूर यांना आदरांजली अर्पण केली आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीला हे दु:ख पचवणं मोठं कठीण झालं आहे. भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अभिनेते ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान ऋषी कपूर चित्रपट सृष्टीतील २ पिढ्यांदरम्यान मार्गदर्शक दुवा होते, हा दुवा निखळला आहे. निखळ करमणूक व चित्रपट सृष्टीत आशयाच्या, तंत्रज्ञानाच्या अंगाने प्रयोग करण्यात ते यशस्वी ठरले. ते सहज सूंदर अभिनेते व तितकेच परखड,प्रांजळ व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने भारतीय कलाक्षेत्राची हानी झाली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.