खा. विनायक राऊत यांनाच क्वारंटाईन करा माजी आमदार उपरकर यांची मागणी

0
321

 

मुंबई, दि.२४ (पीसीबी) -कार्यकर्त्यांचा लवाजमा व १५-२०गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत, खासदारांनी ५ दिवसतरी होम क्वारंटाईन होण्याची गरज होती. मात्र, खा. बिनधास्तपणे जिल्ह्यात फिरत आहेत, म्हणून रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत यांनाच क्वारंटाईन करा, अशी मागणी माजी आमदार उपरकर यांनी केली आहे.

‘सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त असताना मुंबईसारख्या कोरोनाच्या हाॅसस्पाॅट असलेल्या ठिकाणावरून येऊन विनायक राऊत हे जिल्ह्यात भेटी देतात, त्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनाचा प्रभाव वाढण्याची भीती वाटायला लागली आहे,’ असे माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले आहेत.

जिल्ह्याच्या जनतेने जी शिस्त पाळली ती आता का पाळावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे खासदाराना राऊत यांना क्वारंटाईन होण्याची गरज असल्याचंही, उपरकर म्हणाले.