मुंबई, दि.२७ (पीसीबी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोनासाठी नवे रुग्णालय उभारले जात आहे. मात्र या रुग्णालयासाठी मागवण्यात आलेली निविदा सदोष असल्याचा दावा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच रुग्ण, डाँक्टर, नर्स यांचा जीव धोक्यात घालून हॉस्पिटल उभारताय की मृत्यूचा चेंबर? असा सवाल शेलार यांनी प्रशासनला विचारला आहे.
आशिष शेलार यांनी कोरोना रुग्णालयासंदर्भात ट्विट करून सवाल उपस्थित केले आहेत. यात ते म्हणतात की, कस्तुरबा रुग्णालयाच्या परिसरात चीनच्या धर्तीवर कोरोना विशेष रुग्णालय उभारण्यासाठी महापालिकेने निविदा काढली आहे. मात्र या निविदेमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे अशा संवेदनशील कामासाठी नियुक्त केलेल्या सल्लागारांचीच प्रकृती तपासण्याची गरज आहे. त्या सल्लागारांच्या पालिकेने वेळीच चाचण्या करुन घ्याव्यात, असे शेलार यांनी लिहिले आहे.
निविदेत शीतकरण, संसर्ग रोखणारी यंत्रणा,विजेचे ट्रान्सफर व दाब या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख नाही. हा विलगीकरण कक्ष असल्याने शस्त्रक्रिया होणार नाही तर मग निविदेत नायट्रस ऑक्साईड कशासाठी? रुग्ण, डाँक्टर, नर्स यांचा जीव धोक्यात घालून हॉस्पिटल उभारताय की मृत्यूचा चेंबर?
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 27, 2020
कस्तुरबा रुग्णालयाच्या परिसरात चीनच्या धर्तीवर कोरोना रुग्णालय उभारण्यासाठी अनेक त्रुटी असलेली निविदा महापालिकेने काढली आहे. त्यामुळे अशा संवेदनशील कामासाठी नियुक्त केलेल्या सल्लागारांचीच "प्रकृती" तपासण्याची गरज आहे.त्या सल्लागारांच्या पालिकेने वेळीच चाचण्या करुन घ्याव्यात (1/2)
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 27, 2020