“कोरोनाची साथ संपेपर्यंत राळेगणला पर्यटकांनी येऊ नये”

0
332

अहमदनगर,दि.१४(पीसीबी) – कोरोनाची साथ संपेपर्यंत राळेगणला पर्यटकांनी येऊ नये, असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलं आहे. त्यांनी पत्रकाद्वारे हे आवाहन लोकांना केलं आहे.

कोरोना विषाणू आटोक्यात येईपर्यंत पर्यटकांनी राळेगणसिद्धीस न येण्याचं आवाहन अण्णा हजारे यांनी केलं आहे. नागरिकांनी न घाबरता या विषाणूला धैर्याने तोंड देण्यासाठी जी पथ्ये पाळावी लागतात ती पाळावीत जेणेकरून या विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलं आहे.

कोरोनाचा संसर्ग न होण्यासाठी हा रोग आटोक्यात येईपर्यंत राळेगणसिद्धीमध्ये पर्यटकांनी येउ नये, असा निर्णय राळेगणसिद्धी परिवाराने घेतला असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.