गृहमंत्रिपद कोणाकडेही गेलं तरी सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच -संजय राऊत

0
334

नाशिक,दि.२६(पीसीबी) – राज्याचे गृहमंत्रीपद कोणाकडेही गेले तरीही त्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच असतील, कारण मुख्यमंत्री सर्वच खात्यांचे प्रमुख असतात, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी नाशिकमध्ये होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

गृहमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडे जाणार हे स्पष्ट असल्याने शिवसेना कार्यकर्त्ये नाराज असल्याच्या प्रश्नावर त्यांनी वक्तव्य केलं आहे. गृहमंत्रिपद कोणाकडेही दिले असले तरीही सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच असतात, असं स्पष्टीकरण राऊतांनी केलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार हे ५ वर्ष टिकणार असल्याचं राऊतांनी ठासून सांगितलं आहे.