कॉंग्रेस म्हणजे वादळात भरकटलेले जहाज – गिरीश महाजन

0
313

मुंबई, दि, ३१ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. अशातच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मोठ विधान केले आहे.

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गिरीश महाजन यांनी विधासभा निवडणुकीविषयी बोलताना कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी कॉंग्रेस म्हणजे वादळात भरकटलेले जहाज अस विधान केले आहे तसेच बाहेरुन आलेल्या नेत्यांना आपापल्या भागाचा विकास करायचा आहे, सर्वांना राज्यातील नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वावर विश्वास आहे असंही महाजन म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी आघाडीचे केवळ ४० आमदार निवडून येतील अस विधान केले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या या परिस्थितीला अंतर्गत कलह जबाबदार असल्याचही महाजन म्हणाले. ‘शरद पवारांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना नाराज केल्याने ते आमच्याकडे आले तसेच भाजपमध्ये आलेले नेते विनाअट पक्षात आले आहेत असंही महाजन म्हणाले. तसेच यावेळी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले.