काही ठिकाणी कमळाऐवजी राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान – रामदास आठवले

0
475

सोलापूर, दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या ईव्हीएमबाबतच्या मताशी मी सहमत आहे, कारण काही ठिकाणी कमळाऐवजी  राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान झाले आहे,  असा  खोचक टोला रामदास आठवले यांनी शरद पवारांना लगावला आहे.

रामदास आठवले सोलापूरच्या दुष्काळ  दौऱ्यावर आले होते. त्यावेळी आठवले  पत्रकारांशी  बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, ईव्हीएम मशीन या काँग्रेसच्या काळातील आहेत. त्यामुळे काही मशीन खराब असू शकतात. मात्र सर्वच मशीन खराब असू शकत नाहीत.  फडणवीस सरकार अनुभवी नसल्याच्या शरद पवार यांच्या वक्यव्यावर  रामदास आठवले म्हणाले की, फडणवीस सरकार अनुभवी नसेल, तर त्यांना आणखी पाच वर्षे द्यायला हवीत.

शरद पवार हे अनुभवी आहेत, त्यांच्या सरकारने खूप कामे केली, मग तरीही महाराष्ट्र कोरडा कसा? असा सवाल रामदास आठवले यांनी केला. त्यामुळे दुष्काळाला काँग्रेस-राष्ट्रवादीच जबाबदार आहे, असा आरोप ही आठवले यांनी यावेळी केला.