मुंबई, दि.२५ (पीसीबी) – २००३ मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत विरोधीपक्षनेते असताना या कायद्यासाठी मागणी केली होती. मात्र आता त्यांना विसर पडला आहे. ते गांधीच्या समाधीजवळ जाऊन बसले आहेत. कॉंग्रेसने ठरवले असते तर झाले असते तर तेव्हाच कायदा झाला असता. असा टोला माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नागरिकत्व कायद्यावरून कॉंग्रेसला लगावला.