काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून आमंत्रण दिलं जात नाही, हा पक्षपातीपणा आहे – पृथ्वीराज चव्हाण

0
477

मुंबई,दि.१२(पीसीबी)-सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून काँग्रेसला आमंत्रण दिलं जात नाही, हा पक्षपातीपणा आहे. काँग्रेसलाही आमंत्रण द्यायला हवं होतं, असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

काल रात्री राज्यपालांनी राष्ट्रवादीला आमंत्रित केलं. आज रात्री 8:30 वाजेपर्यंत राष्ट्रवादीला वेळ देण्यात आली आहे. परंतु सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी काँग्रेसला आमंत्रण दिलं नाही, हे पक्षपाती आहे.

काँग्रेसलाही आमंत्रण द्यायला हवं होतं, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.