काँग्रेसमधून कचरा गेल्याने ला़डू वाटून आनंद उत्सव साजरा

0
358

मुंबई, दि, ३१ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे क्लब येथे ही मेगा भरती झाली आहे. या भरतीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर. तसेच राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.

यावरून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी भाष्य करताना प्रसारमाध्यमांतून असे दाखवण्यात आले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात चिंतेचे आणि दुःखाचे वातावरण आहे, मात्र आमच्याकडे असे कोणतेही वातावरण नाही. आम्हाला १३५  वर्षांचा इतिहास आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास आहे अस मत व्यक्त केले.

तसेच पुढे बोलताना, जे भाजपमध्ये जात आहे ते गद्दारच होते. यापूर्वीदेखील त्यांनी पक्षांतर केले आहे. नायगाव वडाळामधून एक प्रकारचा कचरा गेला आहे, स्वछता झाली आहे. यांचा आनंद कार्यकर्त्याना झाला आहे. हाच आनंद व्यक्त करण्यासाठी लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असंही वाघमारे म्हणले.