कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा

0
554

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवण्याची शिफारस राज्यसभेत केली, शहा यांनी सभागृहात संसोधन विधेयक मांडताच कॉंग्रेससह इतर विरोधकांनी थयथयाट केला. सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील सरकारला पाठींबा दिला आहे.

आम्ही जम्मूकाश्मीरबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देतो. जम्मू काश्मीरमध्ये शांतता नांदेल आणि विकास होईल, अशी आमची आशा आहे, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनेचे ३७० वे कलम रद्द करण्याच्या सरकारने केलेल्या शिफारसीला पाठींबा दिला आहे.