‘उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र ?’अमृता फडणीवस यांनी केलेले ट्विट डिलीट केले सरकारला डिवचले

0
445

मुंबई, दि. २५ (पीसीबी) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या समाज माध्यमांवर सतत चर्चेत असतात. आपल्या ट्विटद्वारे त्या राज्य सरकारवर टीकाही करत असतात. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटद्वारे ठाकरे सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये काही प्रश्न विचारत सरकारवर निशाणा साधला आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी थोडक्यात उत्तर द्यावे; असं लिहीत वसूली, लोडशेडींग, ट्राफिक वरुन सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये त्यांनी प्रश्न विचारत काही पर्यात दिले आहेत. शिवाय उत्तर दिलेल्या विकल्पांमधूनच एक किंवा सर्व पर्याय निवडून द्यावे, असं लिहीतच आपल्या आधीच्या ट्विटमधील उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे #Maharashtra आमचा ? या शब्दांचा उल्लेख केला आहे.

१. वसूली च्या ताब्यात

२. विकृत अघाडीच्या ताब्यात

३. लोड shedding च्या ताब्यात

४. Traffic Jam आणि अव्यवस्थेच्या ताब्यात

५. गुंडांच्या ताब्यात

दरम्यान, ‘मातोश्री’समोरील हनुमान चालीसा पठण प्रकरणातून राणा दाम्पत्यांनी माघार घेतल्यानंतर शिवसैनिकांनी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी मागावी असा आक्रमक पवित्रा घेतला होता. शिवसैनिकांच्या या मागणीवरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. ‘उध्वस्त ठरकी ने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?’ असे ट्विट केलं होतं मात्र काही वेळाने त्यांनी ते ट्विट डिलीट केलं होतं, मात्र आता पुन्हा त्यांनी ट्विट करत सरकारला डिवचलं आहे.