मुंबई,दि.१५(पीसीबी) – राहुल गांधींना वीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल भर चौकात फोडून काढावंं, असं आवाहन वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं होतं. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
ज्यांना जोडे मारायला सांगताय त्यांचे जोडे १० जनपथला त्यांनी गहाण ठेवले आहेत. कोणाकडून अपेक्षा ठेवताय??, असं म्हणत निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
मी काही राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मरेन पण माफी मागणार नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.