“उगाच वाभाडे काढायचे नाही, सरकारने चांगलं काम केलं तर अभिनंदनही करा”

0
516

मुंबई,दि.९(पीसीबी) – उगाच वाभाडे काढायचे नाही, सरकारने चांगलं काम केलं तर अभिनंदनही करा, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४ वा वर्धापनदिन आज साजरा होत आहे. वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे बोलत होते.

सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना केली आहे. उगाच वाभाडे काढायचे नाही, सरकारने चांगलं काम केलं तर अभिनंदनही करा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

देशात ६०-७० वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसची बिकट परिस्थिती, दिल्ली निवडणुकीत एकही आमदार निवडून आलेला नाही, मग तुमचे १३ आमदार निवडून आले होते? हा प्रश्न आम्हालाच का, असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, १४ वर्ष झाली, प्रवास सुरु आहे, ह्यात माध्यमांनी प्रेम दिलं, बोचरी टीका केली पण हे चालायचंच, असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.