आम्ही सरड्यासारखे रंग बदलत नाही; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा भाजपाला टोला

0
533

मुंबई,दि.७(पीसीबी) – आम्ही सरड्यासारखे रंग बदलत नाही, असं म्हणत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. ते अयोध्येत माध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. शिवसेनेकडून अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, काँग्रेसचे नेते देखील अयोध्येत दाखल झाले आहेत.

आमचं हिंदुत्व कायम असून, आम्ही सरड्यासारखे रंग बदलत नाही. राममंदिरासाठी शिवसेनेची भूमिका कायम महत्वाची राहिली आहे, असं म्हणत अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, सरकार स्थापन होण्यापूर्वीही उद्धव ठाकरे अयोध्येत आले होते. आज मुख्यमंत्री म्हणून येत आहेत, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.