आम्ही आधीही हिंदुत्ववादी होतो आणि उद्याही राहणार, धर्मांतर केलेलं नाही – उद्धव ठाकरे

0
349

नागपूर,दि.१७(पीसीबी) – आम्ही आजही हिंदुत्ववादीच आहोत, धर्मांतर केलेलं नाही,हिंदुत्त्वाचा बुरखा पांघरुन वावरणारी जी मंडळी आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

शिवसेना काय आहे ते सगळ्या देशाला ठाऊक आहे, आम्ही कोणताही बुरखा पांघरलेला नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आपल्याला आधीच्या सरकारसारखं वागायचं नाही. कितीही मोठं झालं तरीही आपण नम्र राहिलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

आज वीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून भाजपने गोंधळ घातला. शिवसेनेचं सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार? असा प्रश्नही त्यांनी विचारला. तुम्ही आम्हाला आमच्या वचनांची आठवण करुन देताय. त्याची काहीही गरज नाही आमचा काही स्मृतीभ्रंश झालेला नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.