आधी मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडा, मग भाजपवर बोला – नारायण राणे

0
352

मुंबई,दि.१२(पीसीबी) – आदित्य ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ट्विट केलं होतं. त्यांच्या ट्विटला भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य यांनी भाजपला शिकवायची गरज नाही. भाजपमध्ये शिकलेली लोक आहेत. आदित्य ठाकरेंना कायदा काय आहे ते माहित नाही. त्यांनी अगोदर मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडावी. त्यामध्ये काही कळतं का ते बघावे, नंतर भाजपवर बोलावं, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर केली आहे.

मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीबाबत नारायण राणे यांनी बोलणं टाळलं आहे. मनसे आणि भाजप युतीबाबत मी बोलणार नाही तर पक्षाचे प्रमुख बोलतील, असं नारायण राणे म्हणाले आहेत.