आदित्य ठाकरेंचा अमृता फडणवीसांना टोला ;सत्ता गेल्यानंं वाईट वाटणारच….

0
357

मुंबई,दि.२७ (पीसीबी) – अमृता फडणवीस आणि शिवसेनेदरम्यान जोरदार ट्विटर वॉर सुरू आहे. अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर ट्विट करत टीका केली होती. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला आहे.

ज्यांनी जनतेला दिलेली वचनं पाळली नाहीत ते आज सत्तेत नाहीत. ज्यांची सत्ता गेली त्यांना वाईट वाटणारच. सत्ता गेल्या पेक्षाही त्यांना आम्ही सत्तेपासून दूर ठेवलं. जे लोक ट्रोल करत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हातात मोबाईल आहे म्हणजे असं काहीतरी करावं लागतं, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी अमृता फडणवीसांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

वरळीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा झोपडपट्टी धारकांना पक्की घरं वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.