आता नारायण राणे फक्त कणकवलीपुरते उरलेत – विनायक राऊत

0
421

सिंधूदुर्ग, दि. ५ (पीसीबी) – नारायण राणे आता फक्त कणकवलीपुरते उरले आहेत. ज्यांना  राणे प्रभावी आणि जनाधार असलेले नेते वाटतात, त्यांनी त्यांची परीक्षा घेऊन पहावी, असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लगावला.

राऊत म्हणाले की, कणकवलीत स्वाभिमान पक्षाचा फक्त एक आमदार आहे. तर रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे पाच आमदार आहेत. त्यामुळे ज्यांना नारायण राणे प्रभावी आणि जनाधार असलेले नेते वाटतात त्यांनी त्यांची परीक्षा घ्यावी, असे  राऊत यांनी म्हटले आहे.

नारायण राणे यांना खऱंच पक्षात घेणार आहेत की नाहीत हे भाजपने एकदाचे काय ते स्पष्ट करावे, असेही राऊत यांनी म्हटले आहे .  जिल्ह्यातील भाजप  नेत्यांचा नारायण राणे यांना पक्षात प्रवेश देण्यास विरोध असून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.