आता तुम्ही काहीतरी करून दाखवा; भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

0
448

प्रतिनिधी दि.१४ मे (पीसीबी) : केंद्र सरकारने देशासाठी पँकेज जाहीर केल्यानंतर मुंबईसाठी वेगळे पँकेज हवे अशी प्रतिक्रिया देणाऱ्या खा. संजय राऊत आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता भाजपा नेते माजी मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी ट्विट करुन उत्तर दिले आहे. केंद्र सरकारने शक्य ते करुन दाखवले आता तुम्ही करुन दाखवा असा टोला त्यांनी लगावला आहे.

आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल!
तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या?
हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला!
मुंबईला कोरोना मुक्त कधी करणार ? हे सांगा,
मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार? हे सांगा
मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? हे सांगा
मुंबई पुरामुळे तुंबणार नाही,
याची हमी द्या
केंद्र सरकार शक्य ते करुन दाखवत आहेतच…आता तुम्ही काहीतरी करुन दाखवा ना!