अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार; छगन भुजबळांची माहिती

0
558

पुणे,दि.८(पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन नऊ दिवस उलटले आहेत. अद्याप मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेलं नाही. विरोधक मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्यासोबत शपथग्रहण केलेल्या मंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणू लागाले आहेत. त्यामुळे राज्यातील लोकांना मंत्रीमंडळ विस्ताराची आणि खातेवाटपाची प्रतीक्षा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीदेखील शपथग्रहण केली आहे. आज पुण्यात माध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळ यांना मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले, यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, विधीमंडळाचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात मंत्रीपदांबाबत रस्सीखेच सुरु असल्यामुळे खातेवाटपला मुहूर्त मिळत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यावर पुढील 7-8 दिवसात तोडगा निघाला नाही तर मंत्रीमंडळ विस्तार लांबेल.