अजित पवारांच्या चौकशीचे टायमिंग राजकीय – प्रकाश आंबेडकर

0
488

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – विरोधी पक्ष संपवण्याचे राजकारण हे सरकार करते आहे तसेच अजित पवार यांच्या चौकशीसाठी जे टायमिंग वापरल जात आहे ते राजकीय आहे असा खळबळजनक आरोप वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी सरकारवर केला आहे.

विरोधक एक एक करुन संपवायच धोरण हे सरकार अवलंबत आहे, असे ही आंबडेकर म्हणाले.

टू जी घोटाळ्यातले सगळे आरोपी भाजपाची सत्ता असताना सुटले आहेत. फक्त विरोधी पक्षच नाही तर विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. चंद्रकांत पाटील हे एक उदाहरण आहेत. उद्धव ठाकरेंना विचारा की ते का बोलत नाहीत? कारण ब्लॅकमेलिंगची भीती सगळ्यांनाच आहे असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम सोबत युती कायम असेल असुदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत बैठक झाली की पुढची माहिती तुम्हाला देऊ अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना दिली आहे.