मुंबई,दि.२४(पीसीबी) – राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते स्वत: माध्यमांच्या समोर येत नव्हते किंवा त्यांची भूमिका समोर येत नव्हती. मात्र आता त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटला तसंच इतर मंत्र्यांच्या ट्वीटला रिप्लाय करत त्यांनी, आता माघार नाही… असंच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
आम्ही महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देऊ जे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं असेल, असा रिप्लाय अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना दिला आहे.
Thank you Hon. Prime Minister @narendramodi ji. We will ensure a stable Government that will work hard for the welfare of the people of Maharashtra. https://t.co/3tT2fQKgPi
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. त्या प्रत्येकाच्या ट्वीटला अजित पवार यांनी रिप्लाय करत Thank you म्हटलं आहे