विमानातून घिरट्या घालून काही होणार नाही; पूरग्रस्तांना मदतीची गरज – प्रकाश आंबेडकर

0
295

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – गेल्या पाच दिवसापासून सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. नागरिकांना मदतीची गरज आहे, त्यामुळे केवळ विमानातून घिरट्या घालून काही उपयोग नाही, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामध्ये शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पूरपरिस्थितीशी नागरिकांचे संघर्ष सामना असतानाच सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांना मदतीची गरज आहे, त्यामुळे केवळ विमानातून घिरट्या घालून काही उपयोग नाही, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.