पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अमृता फडणवीसांनी केले मदतीचे आवाहन

0
455

नागपूर, दि. १२ (पीसीबी) – पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये मोठी वित्तहानी आणि जीवीतहानी झाली. पुराच्या रौद्ररूपात लाखोंचे संसार उघड्यावर पडलेत त्या कोल्हापूर सांगलीकरांसाठी समाजातील घटकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. विविध स्तरातून त्यांच्या पुनर्वसनासाठी सहकार्य केले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही मदतीचे आवाहन केले आहे.

अमृता फडणवीस दिव्याज फाऊंडेशन तर्फे इच्छूकांना सांगली, कोल्हापूरकर पीडीतांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. आपली छोटीशी मदत  खूप मोठी देणगी ठरेल, त्यामुळे समाजातील घटकाने पुढे येऊन पुरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले आहे. त्यांना त्यांच्या फोसबूक पेजवरून ही माहिती दिली आहे.

या मदतीमध्ये विशेषत: मुलांसाठी स्कूल बॅग, टॉवेल, मॅट्रेसेस, सॅनीटरी नॅपकीन्स मदत स्वरूपात देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.