पुणे, दि. ३ (पीसीबी) – सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहेत. तर घरात आमदारकी पासून खासदारकी दिलेली नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पीठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पिठ पण दुसऱ्या पक्षात गेले. आत्ता जमीनच नांगरायची वेळ आली आहे. चांगली मशागत करुन ठेवुया, असे आवाहन शरद पवारांचे नातू आणि जि. प. सदस्य रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
राष्ट्रवादीतून अनेक नेते बाहेर पडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यावर फेसबुकवर पोस्ट टाकून रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.
महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून ते उपेक्षित व दीनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता साहेबांनी वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपाती, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही, तर माणसं जोडणारा हा इतिहास आहे, असे त्यांनी म्हटले आहे.