मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही – आमदार हर्षवर्धन जाधव

0
673

औरंगाबाद, दि. २९ (पीसीबी) – मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण  एसईबीसीअंतर्गत स्वतंत्र कोट्यातून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी, एकूण आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत आहे. त्याचबरोबर हा अधिकार राज्य सरकारला नाही, त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही,  असे मत शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे.