तब्बल ५० लाख लाडक्या बहिणी अपात्र, १५०० रुपये बंद

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि . २८ ( पीसीबी ) – विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. या योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. या योजनेत आतापर्यंत जवळपास ९ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजनेत ५० लाख महिलांचे अर्ज बाद करणार असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या २ कोटी ४६ लाख आहे. त्यातून ५० लाख अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढले जाणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी होणार आहे.

जर लाडकी बहीण योजनेतून ५० लाख महिला अपात्र झाल्या तर दरवर्षाला १ हजार ६२० कोटी रुपये वाचणार आहे. या योजनेत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दर महिन्याला सरासरी ३ हजार ७०० कोटी रुपयांचा हप्ता वितरित केला जात आहे. तापर्यंत सहा महिन्यात तब्बल २१ हजार ६०० कोटी रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील इतर योजनांवर ताण पडत आहे. या योजनेमुळे इतर अनेक योजनांचे पैसे थकले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याचे दिसत आहे.

लाडकी बहीण योजनेत सध्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे. ही पडताळणी पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. यामध्ये महिलांची वयोमर्यादा, इन्कम टॅक्स भरत असलेल्या महिला, चारचाकी वाहन असलेल्या महिलांची तपासणी केली जात आहे. जानेवारी महिन्यात ५ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात ४ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहे. यामुळे सरकारी तिजोरीवरचा बोजा कमी होणार आहे.

Share This Article