भेकड मराठी पत्रकार आणि हिंमतबाज अर्चना तिवारी

2 Min Read

नुकत्याच घडून गेलेल्या नागपूर दंगलीत हिंदूंच्या मालमत्तेचं आणि वाहनांचं अतोनात नुकसान झालं. त्याचप्रमाणे हिंदूबहुल पोलिसांनाही ठरवून टार्गेट करण्यात आलं. ही दंगल मुद्दाम कुरापत काढून मुस्लिम समाजातून पेटवण्यात आली हे उघड सत्य आहे. पण सरकारी आकडेवारी, विरोधकांची टीका दाखवण्यापलीकडे एबीपी माझा, साम टीव्ही, टीव्ही 9, पुढारी, लोकशाही, लोकमत, झी वगैरे भेकड मराठी वाहिन्यांनी काहीही केलं नाही. दंगलग्रस्त भागात फिरून सत्य दाखवण्याची एकाही मराठी पत्रकाराची हिंमत झाली नाही.

या पार्श्वभूमीवर ‘द राजधर्म’ या हिंदी वाहिनीची बहादुर पत्रकार अर्चना तिवारी हिने मुद्दाम नागपूरमध्ये येऊन आणि दंगलग्रस्त भागात फिरून जे दोन व्हिडिओ केले आहेत ते पोलिसांनीही अभ्यासण्यासारखे आहेत. या व्हिडिओमध्ये केवळ हिंदूंचीच वाहने कशी जाळली गेली याचे पुरावे ती दाखवते. याच व्हिडिओत एका मुसलमान तरुणांच्या टोळक्याला ‘हिंदूंच्या मालमत्तेचं नुकसान झालंय म्हणून तुम्हाला हसायला येतंय?’ असा रोखठोक प्रश्नही ती विचारताना दिसते.

‘द राजधर्म’ या हिंदी वाहिनीचे ४५ लाखांहून अधिक सबस्क्राईबर असून त्यावर अर्चना तिवारीचे एकाहून एक धाडसी व्हिडिओ पहायला मिळतात. मोदींच्या सुधारणांमुळे काश्मीरचे मुसलमान कसे हताश झालेत हे आपल्याला माहीत नसलेलं सत्य ती दाखवताना दिसते, त्याचप्रमाणे माफिया मुख्तार अन्सारीच्या दफनाच्या दरम्यान त्याच्या मोहल्ल्यात जाऊन तिथल्या मुस्लिमांना बेधडक प्रश्न विचारतानाही ती दिसते. मणिपूरच्या वणव्यातसुद्धा ती जाऊन आली आहे. असली धाडसी पत्रकारिता एकातरी मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने केलेली तुम्हाला आठवतेय का?

ट्विटरवरसुद्धा अर्चना तितक्याच निर्भीडपणे जबाब देत असते. नोव्हेंबर २०२३ मधील हा एक सवाल-जवाब पहा. एका फुरोगामी स्त्रीने ट्विट केलं, की ‘जर सगळे मुसलमान पाकिस्तानला गेले असते, तर मोहम्मद शमी आणि सिराज हे आज पाकिस्तानचे गोलंदाज झाले असते !’ त्यावर अर्चनाने चोख जवाब दिला, की ‘जर शमी आणि सिराज पाकिस्तानात असते, तर त्यांच्या हातात चेंडूऐवजी आज बॉम्ब असता !’ तिच्या या उत्तराबरोबर समस्त फुरोगामी लिब्रांडू मंडळींचा जळफळाट झाला.

अशा या निर्भय, निर्भीड अर्चना तिवारीतील स्त्रीशक्तीला माझा प्रणाम !

  • हर्षद सरपोतदार
Share This Article