सिडनी, दि. ६ (पीसीबी) – भारताने ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या चौथ्या कसोटीत वर्चस्व मिळवले आहे. चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० गुंडाळला. ३२२ धावांची आघाडी घेत भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला आहे. तब्बल ३० वर्षांनी कांगारुंवर मायभूमीत फॉलोऑनची नामुष्की आली आहे. फिरकीपटू कुलदीप यादवने ९९ धावांत ५ बळी टिपले.