हिंजवडीत पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून कारची तोडफोड

0
554

हिंजवडी, दि. ४ (पीसीबी) – किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाची तक्रार पोलीसात केल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने तरुणाच्या कारची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. ३) पहाटे राधा चौक म्हाळुंगे येथे घडली.

हितेश हरीभाऊ नेटके (वय २९, रा. पाषाण) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय निम्हण, आकाश आगवणे, विकास निम्हण, वैभव दळवी, विशाल निम्हण, राजू कांबळे (सर्व रा. पाषाण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश आणि आकाश आगवणे यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले. त्याबाबत हितेश याने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सोमवारी पहाटे राधा चौक म्हाळुंगे येथे हितेश त्यांच्या मित्राच्या कारमध्ये बसले होते. त्यावेळी पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून आकाश याने त्याच्या इतर पाच साथीदारांसोबत हितेश यांच्या कारची तोडफोड केली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.