हिंजवडीत दोघांना मारहाण करुन लुटले; सोन्याच्या दागिन्यांसह ६८ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केले लंपास

0
516

हिंजवडी, दि. ३० (पीसीबी) – रस्त्याने पायी निघालेल्या दोघा तरुणांना दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी अडवले. तसेच मारहाण करुन सोन्याची अंगठी, ब्रेसलेट, चैन, घड्याळ आणि एक मोबाईल असा एकूण ६८ हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री अकराच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावरील मुळानदीच्या ब्रिजच्या पुढे असलेल्या अंधारातील रस्त्यात घडली.

याप्रकरणी प्रसाद प्रकाश माने (वय ३०, रा. फ्लॅट क्र. ३१, रा. फ्लॅट क्र. ३१, विघ्नहर्ता हेरीटेज सोसायटी आंबेगाव पठार, कात्रज) आणि निवृत्ती रामभाऊ आब्दल (वय ५१, रा. श्री मोरया कॉलनी, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) या दोघांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास प्रसाद आणि निवृत्ती हे दोघे मुंबई-बेंगलोर महामार्गावरील मुळानदीच्या ब्रिजच्या पुढे असलेल्या अंधारातील रस्त्यातून पायी चालेले होते. यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी प्रसाद आणि निवृत्ती यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील सोन्याची अंगठी, ब्रेसलेट, चैन, घड्याळ आणि एक मोबाईल असा एकूण ६८ हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक पवार चोरट्यांचा शोध घेत आहेत.