सुप्रिया सुळे यांच्या विजयाची शरद पवार यांनाच खात्री नव्हती – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

0
648

बारामती, दि. ९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विजयाची शरद पवार यांनाच खात्री नव्हती. आता शरद पवारांना अजूनही आशा आहे की त्यांचेच सरकार येणार. पण केंद्रातील सत्तेनंतर राज्यातही आपलेच सरकार येणार आहे. पवारांना सांगा आमचे सरकार येणार आहे, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीतील कार्यकर्त्यांसमोर केला आहे. ते पक्षकार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने अशी लढत दिली होती की, मतमोजणीच्या दरम्यान पवार साहेबांना सुप्रिया सुळे जिंकतील याची खात्री नव्हती. लोकसभा निवडणुकीत आपण थोडे मागे पडलो. पण नाउमेद न होता आपण कुठे मागे पडलो याचा अभ्यास केला पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

शरद पवारांना अजूनही आशा आहे की, त्यांचेच सरकार येणार आहे. पण केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर राज्यातही आपलेच सरकार येणार आहे, हे पवारांना जाऊन सांगा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.