“सीबीआयने संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंचीही चौकशी करायला हवी”

0
208

मुंबई,दि.१०(पीसीबी) – बिहार भाजपाचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची चौकशी केली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. इतकचं नाही तर आनंद यांनी राऊत आणि आदित्य यांनी नार्को टेस्ट करण्याचीही मागणी केली आहे.

भाजपाचे अधिकृत प्रवक्ते असणाऱ्या आनंद यांनी या प्रकरणाशी संबंधित पुरावे आणि साक्षीदारांमध्ये या दोघांनी आफरातफर केल्याचा आरोपही केला आहे. संजय राऊत यांनी सामनामधील लेखातून पत्रकार अर्णब गोस्वामीबरोबरच सुशांतचे वडील के. के. सिंह, भाजपा आणि बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले होते. याच लेखाचा संदर्भ देत भाजपाच्या प्रवक्त्याने राऊत आणि आदित्या यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ आनंद यांनी ट्विट केला आहे.