सावधान!देशात कोरोना वाढता वाढे, आता रोज १० हजाराने वाढ, पावणे तीनशे मृत्यू

0
348

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सव्वा दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. शुक्रवार सकाळपर्यंत आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 2 लाख 26 हजार 770 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 6,348 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 9 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात मागील 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसमुळे 9851 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
भारतात नव्या रुग्णांच्या वाढीचा वेग जगभरातील इतर देशांच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. बुधवारी ब्राझीलमध्ये 27,312 आणि अमेरिकेमध्ये 20,578 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर रशियामध्ये 8,536 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याचाच अर्थ देशातील नव्या रुग्णांच्या वाढिचा वेग जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात आज 9,851 नवे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिका, ब्राझील, रुस, ब्रिटन, स्पेन आणि इटलीनंतर कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
कोणत्या राज्यांत, किती मृत्यू?
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 2,071, गुजरातमध्ये 1,155, दिल्लीमध्ये 650, मध्य प्रदेशमध्ये 377, पश्चिम बंगालमध्ये 355, उत्तर प्रदेशमध्ये 245, तमिलनाडुमध्ये 220, राजस्थानमध्ये 213, तेलंगानामध्ये 105, आंध्र प्रदेशमध्ये 71, कर्नाटकमध्ये 57, पंजाबमध्ये 47, जम्मू-कश्मीरमध्ये 35, बिहारमध्ये 29, हरियाणामध्ये 24, केरलमध्ये 14, झारखंडमध्ये 6, ओडिशामध्ये 7, असाममध्ये 4, हिमाचल प्रदेशमध्ये 5, मेघालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.