सामन्यादरम्यान विराट कोहलीशी वाद झाला; संतप्त पंचाने दरवाजा तोडला!

0
556

बेंगळुरू, दि. ७ (पीसीबी) – एम. चिन्नास्वामी स्टेडियवर झालेल्या एका आयपीएलच्या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) कर्णधार विराट कोहली आणि पंच नीजल लॉन्ज यांच्यात वाद झाला. या वादानंतर भडकलेल्या पंच लॉन्ज यांनी आपला सगळा राग त्यांच्या खोलीच्या दरवाजावर काढला. लॉन्ज इतके भडकले होते की आपला राग शांत करण्यासाठी त्यांनी दरवाजावर जोराची लाथ मारली. यात दरवाजाचे नुकसान झाले.