सर्वच जातींची जनगणना झाली पाहिजे – रामदास आठवले

0
316
मुंबई, दि.२९ (पीसीबी) – ओबीसी़ंची जातनिहाय जनगणना व्हावी, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. राज्य सरकारने पुन्हा याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पाठपुरावा करावा, असे छगन भुजबळ म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘केवळ इतर मागास वर्गीय अर्थात ओबीसी नाही, तर सर्वच जातींची जनगणना झाली पाहिजे, असे आठवले म्हणाले.