संविधान बदलणे नवरा बदलण्याइतके सोपे नाही; जयदीप कवाडेंची स्मृती इराणींवर वादग्रस्त टिप्पणी

0
598

नागपूर, दि. २ (पीसीबी) – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करतात, मात्र संविधान बदलणे नवरा बदलण्याइतके सोपे नाही, असे वादग्रस्त विधान पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी केले आहे.

जयदीप कवाडे नागपुरातील बगडगंज येथे काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी स्मृती इराणी यांना उद्देशून  वादग्रस्त टिप्पणी केली. जयदीप यांचे भाषण संपल्यानंतर नाना पटोले यांनी जयदीप यांना  बाजूला घेऊन शाबासकीही दिली.

दरम्यान, जयदीप यांच्या या  वादग्रस्त विधानावर सर्वच स्तरातून  टीका होऊ लागली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र, वैयक्तिक टीका करताना भान राखणे गरजे असते. पण सध्या टीकेची पातळी घसरल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे.