संजय काकडे पैसे खूप आले म्हणून अक्कल येत नसते – जितेंद्र आव्हाड

0
624

मुंबई, दि. २९ (पीसीबी) –  संजय काकडे  पैसे खूप आले म्हणून अक्कल येत नसते. पैसे कुणामुळे आले…. पैसे कुणी दिले… कुणी मदत केली.. विसरले कृतघ्न काकडे… अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्यावर पलटवार केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा का दिला? याचा खुलासा केला. यावर संजय काकडे यांनी टीका करताना  ही केवळ नाटकबाजी होती. हा वाद फक्त पवारांनंतर नेतृत्व कुणाचं? याचाच वाद आहे. काल भांडायचं आणि आज राजीनामा द्यायचा, पुन्हा शरद पवार म्हणतील ते करायचं, नौटंकी करून सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न आहे, असे म्हटले होते.

संजय काकडे यांच्या या टीकेचा जितेंद्र आव्हाड यांनी  खरपूस समाचार घेताना संजय काकडे  पैसे खूप आले म्हणून अक्कल येत नसते, असे चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला संजय काकडे काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.