शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता, मग मनसेच्या नावाने शिमगा का ? – जितेंद्र आव्हाड

0
510

 मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. १९८० मध्ये  शिवसेनेने एकही जागा न लढवता काँग्रेसला जाहीर पाठींबा दिला होता. आता  त्यांचाच वारसा मनसे अध्यक्ष राज ठकारे चालवत आहेत.  मग त्यांच्या नावाने शिमगा कशाला?  असा सवाल ट्विट करून आव्हाड यांनी शिवसेनेला केला आहे. 

शिवसेनेने १९८० च्या लोकसभा निवडणुकीत   एकदेखील जागा लढवली नव्हती. शिवाय त्याच निवडणुकीत सेनेने काँग्रेसला  पाठिंबा  दिला होता. आज राज ठाकरे देखील एकही जागा लढवत नाहीत,त्यांच्या नावाने शिमगा करणाऱ्या लेकरांच्यासाठी ही खास माहिती  असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

१९८० सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला समर्थन देखील दिले होत. त्यांचाच कित्ता गिरवत आज राज ठाकरे देखील एकही जागा लढवत नाहीत, तसेच त्यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीला जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने शिमगा करणाऱ्या लेकरांसाठी ही खास माहिती…!, असे ट्विट करीत त्यावेळच्या मार्मिकमध्ये आलेल्या लेखाचे छायाचित्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये वापरले आहे.