मुंबई, दि.३० (पीसीबी) – महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळचा शपथविधी सोहळा विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला. मंत्रिमंडळातील ३६ जणांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून महाविकासआघाडीच्या ३६ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
मात्र, या मंत्रीमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमासाठी आघाडीच्या मित्रपक्षांना निमंत्रणच नसल्याने मित्रपक्षाचे नेते नाराज झाले आहेत. ज्या मित्रपक्षांनी स्वत: नुकसान सोसून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले त्यांना शपथविधीपासून दूर ठेवण्यात आले. तर ज्यांनी ईडी, सीबीआयचे शुक्लकाष्ठ लावले. त्यांना आमंत्रण दिल्याचे सांगत शेट्टी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
राजू शेट्टी यांनी ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केली आहे..
ज्यांनी,ईडी,इनकम टॅक्स, सीबीआयची पीडा मागे लावली त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण आणि ज्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःच नुकसान सोसून आटोकाट प्रयत्न केले ते सर्व घटकपक्ष मात्र शपथविधीला बेदखल.#व्वा_जानते_राजे…!@ANI
— Raju Shetti (@rajushetti) December 30, 2019