विमानाच्या इंजिनात बिघाड; राहुल गांधींच्या संगमनेरमधील सभेला विलंब  

0
477

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – विमानाच्या इंजिनात  बिघाड झाल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी  पाटणा दौरा रद्द करून तातडीने दिल्लीला  पुन्हा रवाना झाले.  याबाबतची माहिती राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) ट्विटऱद्वारे  दिली आहे.  विमानातील बिघाडामुळे त्यांच्या महाराष्ट्रातील संगमनेर, बिहारमधील समस्तीपूर, ओडिशातील बालासोरमधील नियोजित सभांना उशीर होणार आहे.

राहुल गांधी यांच्या आज बिहारमधील समस्तीपूर, ओडिशातील बालासोर आणि महाराष्ट्रातील संगमनेर येथे प्रचार सभांचे आयोजन केले आहे. समस्तीपूर येथील सभेसाठी राहुल हे विमानाने जात होते. सकाळी पाटणा येथे जात असताना त्यांच्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाला.

विमानाच्या कॉकपीटमधील व्हिडिओ त्यांनी ट्विट करून तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली. या उद्भवलेल्या समस्येमुळे संगमनेरसह बिहार आणि ओडिशातील सभा सुरू होण्यास विलंब होणार आहे, असे सांगून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.