मुंबई, दि. २८ (पीसीबी) – विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १७ जून पासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन तीन आठवडे चालणार असून केवळ १२ दिवस कामकाज होणार आहे.
या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प १८ जून रोजी सादर केला जाणार आहे. यानंतर २१ व २४ जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. तर राज्यपालांचे अभिभाषण चर्चा १९ व २० जून रोजी होईल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाची रूपरेखा ठरवली जाणार आहे.
पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ५ ते १० जून दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.