वाकड आणि निगडित हातचलाखी करून पळवले दाखवून ते दागिने

0
252

वाकड, दि. ५ (पीसीबी) – वाकड मध्ये पोलीस असल्याचे सांगून तर निगडी मध्ये पुढे खून झाल्याचे सांगून अनोळखी व्यक्तींनी हातचलाखी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने पळवून नेले. याप्रकरणी मंगळवारी (दि. 4) वाकड आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

लक्ष्‍मण विठ्ठलराव देशमुख (वय 64, रा. द्वारकानगर, नागपूर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी देशमुख हे मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास कोकणे चौक रहाटणी येथील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई खरेदी करून घरी जात होते. त्यावेळी तीन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील दोघांनी फिर्यादी यांना ते पोलीस असल्याचे भासवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांचे दागिने सुरक्षित पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने हातचलाखीने ते काढून घेतले. त्यानंतर तिसऱ्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांचे लक्ष इतरत्र वेधून तिघांनी मिळून फिर्यादी यांचे दोन लाख वीस हजार रुपये किमतीचे 55 ग्रॅम सोन्याचे दागिने पळवून नेले. तीन आरोपींना पैकी एकाने तो पोलीस इन्स्पेक्टर असल्याचे सांगितले. वाकड पोलीस तपास करीत आहेत

संजीव सोमनाथ बडगुजर (वय 52, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संजीव यांच्या आई मंगळवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास प्राधिकरण येथे एका मेडिकल दुकानातून औषधे घेऊन घरी जात होत्या. त्यावेळी दोन दुचाकीवर दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. फिर्यादी यांच्या आईला थांबवून समोर खून झाला आहे, अंगावर सोने घालून जाऊ नका, पुढे धोका आहे, असे सांगत घाबरवले. त्यामुळे फिर्यादी यांच्या आईने घाबरून दोन अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून हातातील दोन सोन्याच्या बांगड्या, एक अंगठी असा 72 हजारांचा ऐवज काढून अनोळखी व्यक्तींकडे दिला. त्यांनी रुमालात गुंडाळून कापडी पिशवीत ठेवण्याचे भासवून ते दागिने पिशवीत न ठेवता फसवणूक करून घेऊन गेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.