नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – लोकसभा अध्यक्षांच्या आसनासमोरील कळया जागेत येऊन गोंधळ घालणाऱ्या तसेच सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय निर्माण करणाऱ्या एआयडीएमकेच्या २६ खासदारांवर लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज (बुधवार) निलंबनाची कारवाई केली.
कावेरी पाणी वाटपावरुन एआयडीएमकेच्या खासदारांनी गोंधळ घातला. आता निवडणुका जवळ येत आहेत. भाजपला कर्नाटकात काही जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी त्यांनी मीकीदातू धरण प्रकल्पाला मंजुरी दिली. विरोध करणे हा आमचा लोकशाही अधिकार आहे, असे एआयएडीएमकेचे खासदार एम. थंबीदुराई म्हणाले.