लोकसभेच्या निकालानंतर गुजरातमधील भाजपचे सरकार कोसळणार – शंकर सिंह वाघेला

0
520

अहमदाबाद, दि. ३० (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मेरोजी लागल्यानंतर गुजरातमधील भाजपचे सरकार कोसळेल, असा दावा ज्येष्ठ नेते शंकर सिंह वाघेला यांनी केला आहे. गुजरातमधील अनेक आमदार सरकार पाडण्यासाठी राजीनामे देतील, असेही वाघेला यांनी म्हटले आहे.  

वाघेला म्हणाले की, गुजरातमधील भाजपचे  अनेक आमदार पक्षावर नाराज आहेत.  त्यांचे म्हणणे कोणीही ऐकून घेत नाही. भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे.  महाराष्ट्रातील अनेक भाजप आमदारांनीही मला हेच सांगितले.  त्यामुळे  लोकसभेचा निकाल  लागल्यानंतर हे सर्व आमदार  भाजपमधून बाहेर पडतील,   असे वाघेला यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसला १० जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला. पण, भाजपने वाघेला यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. वाघेला यांच्या विधानात काहीही तथ्य नाही. ते केवळ चर्चेत राहण्यासाठी अशी विधाने करत आहेत, असे भाजपने म्हटले आहे.