लोकसंख्या नियंत्रणाबाबत दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका; सुनावणीस न्यायालयाने दर्शवली संमती

0
309

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – लोकसंख्या नियंत्रणाबाबत दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये केंद्र सरकारला आवश्यक पाऊल उचलण्याची मागणी केली आहे. भाजपचे नेते व वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी मंगळवारी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने संमती दर्शवली आहे.